बंद

इतिहास

सांगलीचा इतिहास🎥 / कृष्णामृत

सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेचे चार तालुके व कर्नाटक सीमेलगतचे दोन तालुके मिळून १-८-१९४९ रोजी सहा तालुक्यांचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला होता. त्यामध्ये जत, औंध, कुरुंदवाड, मिरज व सांगली संस्थानिकांच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता. पुढे संयुक्त महाराष्टाच्या स्थापनेनंतर २१ नोव्हेंबर १९६० रोजी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे नाव सांगली जिल्हा असे केले. या जिल्ह्यात १९६५ साली कवठे महांकाळ व आटपाडी हे नवे दोन तालुके निर्माण केले गेले. १९९९ साली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने (युती सरकारने) पलूस तालुक्याची आणि नंतरच्या सरकारने २८ मार्च २००२ रोजी जिल्ह्यात कडेगाव नावाच्या १०व्या तालुक्याची निर्मिती केली. सांगलीचे गणपती मंदिर हे खाजगी असल्यामुळे त्याचा सर्वा खर्च श्रीमंतराजे हे करतात.

विशेष हे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण होय. मराठी माणसाच्या जीवनात अढळ असे स्थान असलेल्या मराठी नाटकाचे उगमस्थान म्हणजे सांगली जिल्हा होय. येथेच विष्णुदास भावे यांनी पहिले मराठी नाटक सीतास्वयंवर सादर केले.

गजानन दिगंबर माडगूळकर(१ ऑक्टोबर १९१९ – १४ डिसेंबर १९७७) हे विख्यात मराठी कवी, गीतकार, लेखक आणि अभिनेते होते. ते त्यांच्या नावाची आद्याक्षरे ग.दि.मा. या नावाने लोकप्रिय आहेत यांचा जन्म शेटफळे, सांगली जिल्हा.

औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापून आणणारे विठोजीराव चव्हाण व प्रतिसरकारचे प्रणेते नाना पाटील यांच्यासारख्या खंद्या वीरांना जन्म देणारी ही भूमी आहे. कलावंतांचा जिल्हा म्हणूनही सांगली प्रसिद्ध आहे. उत्तम दर्जाच्या तंतुवाद्यांची निर्मिती हे सांगली जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे.

संस्थानी खाणाखुणा, सुंदर कृष्णाकाठ आणि सहकारमहर्षी वसंतदादा पाटील यांचे जन्मस्थान हीदेखील सांगलीची ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. नाट्यपंढरी व कलावंतांचा म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा औद्योगिक क्षेत्रात तसेच कृषी क्षेत्रातही प्रगती साधण्याचा प्रयत्‍न करत आहे.

सांगली जिल्हा साखरपट्ट्यात येत असल्यामुळे येथे अनेक साखर-कारखाने आहेत. वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील क्र.१ चा सहकारी साखर कारखाना आहे.

नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व, (जन्म : २६ जून, इ.स. १८८८ ; नागठाणे, सांगली, महाराष्ट्र – मृत्यू १५ जुलै, इ.स. १९६७) या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. बालगंधर्व भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. पुढे ते त्याच नावाने लोकप्रिय झाले.

अब्दुल करीम खान यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८७२ रोजी उत्तर प्रदेशातील शामली येथील किराणा शहरात एका संगीत परंपरेच्या कुटुंबात झाला ज्याची मुळे संगीतकार बंधू गुलाम अली आणि गुलाम मौला यांच्यापासून सुरू झाली. त्यांचे वडील काले खान हे गुलाम अली यांचे नातू होते. अब्दुल करीम खान यांनी त्यांचे काका अब्दुल्ला खान आणि वडील काले खान यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. त्यांना दुसरे काका नान्हे खान यांचे मार्गदर्शन देखील मिळाले. अब्दुल करीम खान यांच्यावर ग्वाल्हेर घराण्याचे उस्ताद रहमत खान यांचा संगीताचा प्रभाव होता. गायन आणि सारंगी व्यतिरिक्त त्यांनी वीणा, सितार आणि तबला देखील शिकले.
अब्दुल करीम खान यांना म्हैसूर दरबारात आमंत्रित करण्यात आले होते जिथे त्यांची भेट कर्नाटक संगीतातील प्रसिद्ध गुरुंशी झाली ज्यांनी त्यांच्या संगीतावरही प्रभाव पाडला. विशेषतः त्यांच्या सरगमच्या गायनावर कर्नाटक पद्धतीचा थेट प्रभाव होता. ते म्हैसूर पॅलेसमध्ये वारंवार येत असत. त्यांना संगीतरत्न ही पदवी दिली. म्हैसूरला जाताना, ते धारवाडमध्ये त्यांच्या भावासोबत राहत असत जिथे त्यांनी त्यांचे सर्वात प्रसिद्ध शिष्य सवाई गंधर्व यांना शिकवले. १९०० मध्ये, आठ महिने त्यांनी केसरबाई केरकर यांना शिकवले, ज्या पुढे २० व्या शतकातील सर्वात प्रसिद्ध गायिकांपैकी एक बनल्या. १९१३ मध्ये, त्यांनी विद्यार्थ्यांना संगीत शिकवण्यासाठी पुण्यात आर्य संगीत विद्यालयाची स्थापना केली. दक्षिणेच्या एका संगीत दौऱ्यावरून परत येताना, २७ ऑक्टोबर १९३७ रोजी त्यांच्या मृत्यूपर्यंत ते अखेर मिरजमध्ये स्थायिक झाले. दरवर्षी ऑगस्टमध्ये, त्यांच्या सन्मानार्थ मिरजमध्ये स्मारक संगीत मैफिली आयोजित केल्या जातात.
ऐतिहासिक महत्त्वाचे

प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी आदी सत्तांचा उत्कर्ष व ऱ्हास अनुभवला. पेशवाईच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्थान होते. या संस्थानांवर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. मिरज हेदेखील संस्थान होते. स्वातंत्र्यपूर्व काळात सविनय कायदेभंगाच्या चळवळीत जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिळाशी येथे मोठा सत्याग्रह झाला होता. गोरक्षनाथ महाराजांनी ( नवनाथांतले दुसरे नाथ) शिराळ्यामध्ये ३२ शिराळा येथे सुरू केलेला नागपंचमीचा उत्सव जगप्रसिद्ध आहे.मिरज येथील तंतुवाद्ये अतिशय प्रसिद्ध असून येथील वाद्ये जगभर पाठविली जातात.